Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

नवरंग

                         ' निसर्ग म्हणजे विविध रंगांची उधळण' हे काव्यात्मक वाक्य आपण खूप ठिकाणी वाचलं किंवा ऐकलं असेल. निसर्गात काही प्राणी, पक्षी, फळ, फुलं ही खास त्यांच्या रंगांसाठी प्रसिद्ध असतात. पण जेव्हा हे सारे रंग एकत्र येतात तेव्हा जे दृश्य असते ते खूपच मनमोहक ठरते. इंद्रधनुष्य, मोरपंख हे सगळं काही आपल्या मनावर बिंबायला हेच सूत्र तर कारणीभूत आहे. पक्षी आणि फुलपाखरं ही तर जणू निसर्गातल्या सगळ्या रंगांचे प्रतिनिधीच भासतात. हिरवा पोपट, काळी मैना अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. यावरूनच पोपटी, मोरपंखी अश्या काही रंगांची नाव प्रचलित झालेली  आहेत. असाच अजून एक पक्ष्यांच्या जगतातील रंगांचा आविष्कार म्हणजेच ' नवरंग '. घाबरलेल्या अवस्थेत अंगणात असलेला नवरंग           या पक्ष्याची आठवण होते आणि लिहावस वाटलं त्याच कारण अस की कोल्हापूर शहरात मिळालेलं त्याच अस्तित्व. काही दिवसांपूर्वी मला माझे परिचित श्री. राबाडे यांचा फोन आला. साधारण दुपारचे बारा वाजले असतील....

महिमतगड...

                                                     साधारण सकाळचे दहा वाजले, तेव्हा आम्ही गडावर पोहोचलो. थोडी नजर खाली करून बघितलं तर कळलं की काल बस मधून उतरल्या उतरल्या जे डोंगराचे कडे दिसत होते त्यावरच हा गड आपले अस्तित्व राखत उभा आहे. (या गडाच्या नावात खूप गोंधळ होतो काहीजण महिमतगड उल्लेख करतात तर बऱ्याच लेखात आणि गुगल मॅपवर महिमानगड असा उल्लेख आढळतो.) मी सोबत आणलेल्या साप पकडायच्या अाकड्याने साप तर पकडला नाही पण चढताना अधीमधी त्याचा टेकू म्हणून वापर मात्र नक्की झाला. थोड पुढे आल्यावर मामा म्हणाले, " हा गडाचा मेन दरवाजा" थोडेफार दगडी बांधकामाचे अवशेष होते तिथे. त्यातल्याच एका दगडावर सकाळी ऊन खात पडलेली एक घोरपड आमची चाहूल लागताच दगडाच्या कपारीत गायब झाली. तिथून पुढे जाताना त्या कपारीत पुन्हा एकदा वाकून बघायला मी विसरलो नाही.              कधी काळी मावळ्यांच आणि शिवाजी महाराजांच्या स्व...

जळू...

                     जळूंच्या भीतीने सगळी मुलं शांतच चालत होती. वाटेत येणारे पक्षांचे आवाज ऐकत आम्ही थोडा चढ चढत होतो. तेवढ्यात आमच्यातला एक मुलगा पाठीमागून ओरडलाच, " सर, जळू...जळू". सगळीच थांबलो आम्ही. त्याच्या पायावर एक जळू चिकटला होता. तो पाय जोरजोराने झटकू लागला, सर बोलले, "अरे थांब काढू तरी दे" सरांनी त्याचा पाय धरला आणि एका पानात धरून तो जळू ओढून काढला. तस त्या जागेवरून त्याच रक्त घळाघळा वाहू लागलं. एवढासा जीव केवढ रक्त काढलं त्याने त्या पोराचं. तेवढ्यात मामा मागे आले "काय नाही व्हत त्याला, आम्हाला अंगभर लगत्यात तसली," सरांकडे बघत पुढे बोलत, " सर वढून कशाला काढला, तंबाखू व्हती की माझ्याकडं थोडी लावली की लगेच सोडत ते" सर म्हणाले, " होय का ,  आम्हाला माहीतच नव्हतं, ह्यो नाचायला लागला मग काय करायचं, आणि मामा तुम्ही तंबाखू खाता आम्हाला काय माहीत?," सरांनी मामाची थोडी फिरकी घेत हसतच बोले. "गावात कोण तंबाखू खात नाही? उगाच पोरांसमोर नको म्हणून मळली नाही मगापासून ". अस मामा म्हणाले. चांगले विचार होते मामाचे...असो. त्यांच...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...

वेलकम टू जंगल...

                                                               अगदी पहाटे झोपेतून कोणीही न उठवता आयुष्यात पहिल्यांदा उठलो. परंतु मी लवकर उठलो याचा भ्रम काहीच वेळात मोडला. त्याच झालं अस की, बाहेर आवरायला गेलो तेव्हा पाहिलं सर तर केव्हाच उठून तयार होते आणि कालचे जेवण बनवणारे शिपाई मामा कढईत पोहे ढवळत होते. तरी आम्ही पटापट आवरून एखाद्या मोहिमेला सज्ज व्हावे तस शाळेच्या पटांगणात येऊन उभे राहिलो. शिपाई मामांनी पोहे एका डब्यात भरून घेतले आणि आणि आम्ही सगळे जण मोठ्या उत्साहाने शाळेच्या बाहेर पडलो. मादी नर              साधारण सकाळचे सात वाजले असतील. पावसाळा संपला असला तरी त्याची ओल अजूनही जमिनीमध्ये होती. गाव सोडून आम्ही एका डोंगराच्या पायथ्याला आलो. वाटेत जंगलाची चाहूल देणारे हळद्या, जंगल मैना, सुर्यपक्षी, नारंगी डोक्याचा मशिमार हे किती तरी पक्षी दिसत होते. तेवढ्यात अचानक मामा ओर...

रात्रीचा मुक्काम

                                                                          कुंडी गावाच्या थोड्या बाहेर असलेल्या शाळेत आमचा मुक्काम होता. त्याच गावातील एक मावशी आणि शाळेचा शिपाई यांनीच आमचं रात्रीच जेवण बनवलं. तश्या वातावरणात निव्वळ गरमागरम भात आमटी हे जेवण पण त्या वेळी वेगळीच चव देऊन गेलं. ‌                  जेवण झाल्यावर जोशी सर बोलले," चला रे, थोडा फेरफटका मारून येऊया बाहेर". तस आम्ही सगळे हातात ब्याटरी घेऊन लगेच शाळेच्या पटांगणात हजर...!  आम्हाला रात्रीच अस त्या गावापासून दूर जाणाऱ्या रस्त्याने  फिरणं पण रोमांचकारी वाटत होत. थोड पुढे चालत गेल्यावर सर म्हणाले, " बसुया का इथे थोडा वेळ?". आणि उत्तराची वाट न पहाता सर रस्त्यात मधोमध बसून गेले. आम्ही सगळे त्यांच्या भोवताली आणि मग गप्पा आणि जंगलाबद्दलच्या शंका सुरू झाल्या.       ...

ट्रेकिंग...

                    लहानपणी जंगलाबद्द्दल निर्माण झालेल्या कुतुहलाला खत पाणी घालायचं काम discovery सारख्या टीव्ही चॅनल्सनी चोख बजावल. अधून मधून शाळेतील भूगोल, पर्यावरण हे विषय पण काहीसे मदत करायचे. पण खरी मज्जा ही जंगलात फिरण्यात होती, जस टीव्हीवर ब्रेअर ग्रील्स फिरतो तस आणि ती संधी लवकरच मिळाली . शाळेतून एक मुक्कामी जंगल सहल आयोजित केली. जोशी सर जे संस्कृत शिकवायचे त्यांनी आम्हाला रत्नागरीतील कुंडी या गावी आपण जात असल्याचे सांगीतले.                     ठरल्याप्रमाणे आम्ही वीसभर विद्यार्थी अगदी सकाळी कोल्हापूर बस स्थानकावर आलो. माझ्याकडे एक लोखंडी सळई होती जी मी टोकाला थोडी वाकवून घेतली होती. सापाचा आकडा  हो ! आजूबाजूची लोक पण माझ्याकडे कडे थोड्या वेगळ्या नजरने बघत होते खास करून माझ्या सापाच्या  आकड्याकडे... खरी गोष्ट हि होती की तो आकडा मी आदल्या रात्रीच बनवला होता आणि त्यापूर्वी मी कधीही सापाला स्पर्श पण केला नव्हता . पण टीव्ही इफेक्ट होता ना ट्रेकिंगला जाताना डोक्यात ! ...

जंगल - पहिली नजर...

        जंगल बुक मधील मोगलीच जंगल असो वा आपल्या आसपास असणार एखाद जंगल. हा शब्द लहानपणी वाघ सिंहाच्या गोष्टी ऐकताना जो कानावर पडतो अगदी तेव्हापासून त्याची ओळख आपल्याला होते. पुढे मग शाळेतील अभ्यास , पुराणातील कथा या माध्यमातून पुन्हा हा विषय अधूनमधून थोडासा स्पर्श करून जात असतो . पण जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला जातो, खास करून एखाद्या घाट रस्त्याने, तिथे मात्र शंभर टक्के आपली भेट या खऱ्याखुऱ्या जंगलाशी  होते. विशेषतः प्रौढांपेक्षा लहानग्यांना जंगलाविषयी अधिक कुतूहल असते. जसं लहान लेकरांना आईचा लळा हा ते मोठे होण्याच्या तुलनेत अधिक असतो. खरंच आहे ते! जंगल हि सुद्धा आपली आईच आहे ना?                  माझी पहिली नजर जंगलावर पडली आणि जंगल म्हणजे काय असतं ते मी पाहिलं गणपतीपुळे च्या प्रवासात... लहान म्हणजे अगदी चौथीत असताना कोल्हापूरहून गणपतीपुळ्याला निघालो होतो. वाटेत आंबा घाट लागतो, कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात उत्तरेकडचा कोकणात उतरवायचा मार्ग.             सकाळच्या वळेस खोल दरीत दिसणार...