Skip to main content

रात्रीचा मुक्काम

                   
                 
         
                          कुंडी गावाच्या थोड्या बाहेर असलेल्या शाळेत आमचा मुक्काम होता. त्याच गावातील एक मावशी आणि शाळेचा शिपाई यांनीच आमचं रात्रीच जेवण बनवलं. तश्या वातावरणात निव्वळ गरमागरम भात आमटी हे जेवण पण त्या वेळी वेगळीच चव देऊन गेलं.
‌                  जेवण झाल्यावर जोशी सर बोलले," चला रे, थोडा फेरफटका मारून येऊया बाहेर". तस आम्ही सगळे हातात ब्याटरी घेऊन लगेच शाळेच्या पटांगणात हजर...!  आम्हाला रात्रीच अस त्या गावापासून दूर जाणाऱ्या रस्त्याने  फिरणं पण रोमांचकारी वाटत होत. थोड पुढे चालत गेल्यावर सर म्हणाले, " बसुया का इथे थोडा वेळ?". आणि उत्तराची वाट न पहाता सर रस्त्यात मधोमध बसून गेले. आम्ही सगळे त्यांच्या भोवताली आणि मग गप्पा आणि जंगलाबद्दलच्या शंका सुरू झाल्या.
                चारी बाजूंनी काळा कुट्टा अंधार होता. मोबाईल फोन तर तेव्हा फक्त सरांकडेच होता. त्यामुळे सगळे जण शंभर टक्के सरांकडे लक्ष देऊन त्यांचं बोलणं ऐकत होती. तेवढ्यात जंगलाच्या बाजूने थोडासा चालू बंद होणारा प्रकाश मला दिसला तोच मी ओरडलो, "सर ते बघा! काही तरी आहे तिथे". तस सगळीच मुलं आणि सर देखील ताडकन उठून उभे राहिले. सुमारे अर्धा तास आम्ही तर्क लावत उभेच होतो पण एवढ्या रात्री जंगलात कोण जाईल हाच प्रश्न परत सगळ्या तर्काच्या शेवटी येत होता. काही मुले बोलली पण,' सर चला आपण जाऊया परत शाळेत झोपायला.' पण  अमाच्यातली काही मुलं ते काय आहे हे माहिती करूनच जायचं या मतावर ठाम होती . त्यात आमची थोडी चुळबूळ सुरू होती. तोच सर ओरडले "थांबा रे, ती माणसाचं आहेत इकडेच येत आहेत ती ". थोड्या वेळाने ती लोक आमच्या जवळ आली. तिघे जण होते ते, त्यातल्या एकाच्या हातात एक पोत होत, त्यात थोडी हालचाल सुरू होती. आणि बाकी दोन लोकांच्या पाठीवर एक वेताच्या काठीपासून तयार केलेले बाणाच्या भात्यासारखे काही तरी होते. सरांनी त्यांना थोड्या ग्रामीण शैलीतच विचारलं , "काय काय हो काय पकडून आणला, आम्ही शाळेची सहल घेऊन आलोय कोल्हापूरहून तुमच्या गावात, मुलांना पण दाखवा की." त्यावर त्यांनी आपल्या हातातल्या ब्याटऱ्या सुरू करून पोत अर्धवट उघडून दाखवलं... ते बघून सरांची प्रतिक्रिया, "अरे बापरे! "
                      त्यात तर पंधरा वीस मोठे खेकडे वळवळत होते . त्यातला एक बोला, " वड्यातन पकडून आणलय रस्स्याला, नेतस का एक दोन उद्याच्या जेवणाला?" त्याची बोलण्याच्या लकबीने सगळीच हसू लागली आणि काही वेळापासून असलेले गंभीर वातावरण चटकन निवळले. त्यांच्यातल्या एकाला मी विचारलं, की हे पाठीवर काय आहे तुमच्या?
                          त्यावर तो मोठ्याने बोलला , " त्याला खून बोलतात इकडे...खून...खेकडाच जाळा असा ते, एक टाईम आत गेलो की परत बाहेर येत नाही त्यो." आम्ही सगळी आश्चर्याने त्या वस्तूकडे बघत होतो. त्यानंतर सरांनी त्यांच्याशी थोडी बातचीत केली आणि मग ती लोक "सांभाळून जावा उद्या फिरायला" अस बोलून निघून गेली. आम्ही पण चालत शाळेत आलो, रात्र खूप झाली होती सगळे जण झोपी गेले . सर आणि त्या लोकांचं बोलणं परत परत आठवत माझे डोळे हळूहळू मिटू  लागले आणि कधी गाढ झोप लागली हे समजलच नाही...
 

 - Chetan Kokatnur
   

Comments

  1. उत्तम मांडणी...पुढचा भाग जाणून घेण्याची इच्छा झाले

    ReplyDelete
  2. Nice writing.Let's have same incidents stories.

    ReplyDelete
  3. लै भारी मित्रा💥😍
    लवकरच नवीन भाग येऊदे...

    ReplyDelete
    Replies
    1. दोन दिवसात पुढील भाग येईल. धन्यवाद.

      Delete
  4. Rememberd my school days, when we gone as same

    ReplyDelete
  5. Nice writing bro....keep it up👍🏻

    ReplyDelete
  6. Awesome story Sir..... I would so happy if we shall on such a adventure nature tour.

    ReplyDelete
  7. Its getting interesting. Nice flow of writing. Good going.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?

                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आप...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज

                सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत. हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. २०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म...