Skip to main content

ट्रेकिंग...


                    लहानपणी जंगलाबद्द्दल निर्माण झालेल्या कुतुहलाला खत पाणी घालायचं काम discovery सारख्या टीव्ही चॅनल्सनी चोख बजावल. अधून मधून शाळेतील भूगोल, पर्यावरण हे विषय पण काहीसे मदत करायचे. पण खरी मज्जा ही जंगलात फिरण्यात होती, जस टीव्हीवर ब्रेअर ग्रील्स फिरतो तस आणि ती संधी लवकरच मिळाली . शाळेतून एक मुक्कामी जंगल सहल आयोजित केली. जोशी सर जे संस्कृत शिकवायचे त्यांनी आम्हाला रत्नागरीतील कुंडी या गावी आपण जात असल्याचे सांगीतले.
                    ठरल्याप्रमाणे आम्ही वीसभर विद्यार्थी अगदी सकाळी कोल्हापूर बस स्थानकावर आलो. माझ्याकडे एक लोखंडी सळई होती जी मी टोकाला थोडी वाकवून घेतली होती. सापाचा आकडा  हो ! आजूबाजूची लोक पण माझ्याकडे कडे थोड्या वेगळ्या नजरने बघत होते खास करून माझ्या सापाच्या  आकड्याकडे... खरी गोष्ट हि होती की तो आकडा मी आदल्या रात्रीच बनवला होता आणि त्यापूर्वी मी कधीही सापाला स्पर्श पण केला नव्हता . पण टीव्ही इफेक्ट होता ना ट्रेकिंगला जाताना डोक्यात! त्याचाच परिणाम म्हणजे तो आकडा. अखेर देवरुखची बस मिळाली आम्ही सगळे गाडीत बसलो. मी भांडून खिडकी काबीज केली आणि वाटेत लागणाऱ्या आंबा घाटाची वाट बघत बसलो....
             दुपार झाली तेव्हा आम्ही देवरूखला पोहोचलो. तिथून अजून एका बसने कुंडी या गावला जायला निघालो. वाटेतली ती अस्सल कोकणी गाव बघत आम्ही तासाभरात कुंडीला पोहोचलो. कुंडी हे गाव खूपच सुंदर आणि टिपिकल कोकणी गाव होत. गावला तिन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगरांचे कडे अगदी सहज दिसत होते. आमचा मुक्काम एका शाळेत होता आणि शाळा गावाबाहेर. उंच डोंगराच्या कुशीत वसलेलं ते गाव आणि ती शाळा ही वाट पायी चालत जाताच एका खोल गंभीर जंगलाच्या शेजारी आम्ही येऊन थांबलो असल्याची जाणीव झाली होती. या जंगलाने मला जणू काही इथे ओढूनच आणल होत. काही वेळाने आम्ही सर्व जण त्याच्या कवेत जाणार होतो....
  

-  Chetan Kokatnur

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

लॉकडाऊन आणि वन्यजीव संघर्ष

                                    आज सगळीकडे लॉकडाऊन आहे. बरेच जण घरी अडकून आहेत. मात्र निसर्ग आज मोकळा श्वास घेतोय. कोल्हापूरमधील घाटमाथ्यावरील कित्येक माझ्या निसर्गप्रेमी मित्रांचे मला फोन येतात की 'अरे आज आमच्या इथे घराच्या मागे गव्यांचा कळप आला होता...आम्ही पन्हाळ्यावर बिबट्या बघितला... शेतात भेकराचे ठसे मिळाले.' अस बरच काही! काही दिवसापूर्वीच कोल्हापूरमध्ये माझ्या परिचयाचे राबाडे सर यांच्या घरी नवरंग हा शहरात तसा क्वचितच सापडणारा सुंदर पक्षी आढळला. बाकीच्या गावाजवळ वन्यजीव दिसण्याच्या बातम्या वर्तमापत्राद्वारे आपण पाहतोच आहोत.          हे सगळे पाहिले तर एका गोष्टीचा विचार मनात आल्याशिवाय थांबत नाही. मानव वन्यजीव संघर्ष या टायटलखाली बदनाम होणाऱ्या या वन्यजीवांना आपण तर खूप आधीपासूनच लॉकडाऊन केलंय. कुठे रस्ते बांधून तर कुठे धरण. जंगलाला लागून केलेली अनियंत्रित शेती आणि मोठे विकास प्रकल्प हे या वनांसाठी आणि तेथील वन्यजीवांसाठी एक प्रकारचे कायमस्वर...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

ठिपक्या वाघाची विष्ठा

                                      मोकळ्या वाटेतून जंगलातील अरुंद वाटेवर प्रवेश करताच अवतीभोवती झालेले सगळे बदल सहज जाणवत होते. जंगलात पाय पडताच एकदम थंडगार एसी खोलीत गेल्यासारखं वाटलं. सूर्यप्रकाश पण झाडांच्या आडोश्याने अधून मधूनच अंगावर पडत होता. किती तरी अनोळखी झाडे, वेली यांनी जणू काही स्वतः बाजूला सरकून आमच्यासाठी थोडीशी वाट करून दिली होती, इतकी दाटीवाटी त्या जंगलात होती. माझा सापाचा आकडा हा हातातच होता. कुठे तरी साप दिसला तर त्याला त्याने किमान उचलायचा तरी प्रयत्न करायचा अस ठरवल होत मी. नजर सगळीकडे फिरत होती पण वाटेत लाल रंगाच्या मोठ्या रान मुंग्यांच्या रांगा पायाखालून जात होत्या. त्यांच्या भीतीने सारखी नजर फिरून पुन्हा पुन्हा पायवाटेवरच येत होती.  दोघांना त्यांनी चांगलंच चावून नाचावल सुध्दा होत. ‌                        थोड पुढं गेल्याव...