Skip to main content

जळू...


                     जळूंच्या भीतीने सगळी मुलं शांतच चालत होती. वाटेत येणारे पक्षांचे आवाज ऐकत आम्ही थोडा चढ चढत होतो. तेवढ्यात आमच्यातला एक मुलगा पाठीमागून ओरडलाच, " सर, जळू...जळू". सगळीच थांबलो आम्ही. त्याच्या पायावर एक जळू चिकटला होता. तो पाय जोरजोराने झटकू लागला, सर बोलले, "अरे थांब काढू तरी दे" सरांनी त्याचा पाय धरला आणि एका पानात धरून तो जळू ओढून काढला. तस त्या जागेवरून त्याच रक्त घळाघळा वाहू लागलं. एवढासा जीव केवढ रक्त काढलं त्याने त्या पोराचं. तेवढ्यात मामा मागे आले "काय नाही व्हत त्याला, आम्हाला अंगभर लगत्यात तसली," सरांकडे बघत पुढे बोलत, " सर वढून कशाला काढला, तंबाखू व्हती की माझ्याकडं थोडी लावली की लगेच सोडत ते" सर म्हणाले, " होय का, आम्हाला माहीतच नव्हतं, ह्यो नाचायला लागला मग काय करायचं, आणि मामा तुम्ही तंबाखू खाता आम्हाला काय माहीत?," सरांनी मामाची थोडी फिरकी घेत हसतच बोले. "गावात कोण तंबाखू खात नाही? उगाच पोरांसमोर नको म्हणून मळली नाही मगापासून ". अस मामा म्हणाले. चांगले विचार होते मामाचे...असो. त्यांचं हे बोलणं आणि जळू काढायचा कार्यक्रम चालू होता तेव्हा प्रत्येक जण आपापल्या पायाला काही लागलंय का ते तपासत होता. बॅग खाली ठेवली तर त्यावर जळू चढतील या भीतीने कसरतच सुरू होती सर्वांची.
जळूचा समावेश ‘अ‍ॅनिलिडा’ (वलयांकित) संघाच्या ‘हिरुडिनिया’ या वर्गात होतो. पावसाळ्यात तर हा हमखास जंगलात आढळतो परंतु पावसाळा संपला तरी काही दिवस जमिनीमध्ये ओल असू पर्यंत त्याचे अस्तित्व असते. अतिशय लवचिक असणारा या जीवाच्या दोन्ही टोकाला चुषक असते. अधर बाजूला तोंड असते. एकाद्या प्राण्याला चिकटला की तो तोंडावाटे 'हिरुडीन' नावाचा स्त्राव स्त्रवतो ज्यामुळे तो भाग बधीर होतो आणि तेथील रक्त गोठत नाही त्यामुळे तो सहज रक्त शोषून घेतो. बधीर झाल्यामुळे आपल्याला जळू लागला आहे याची जाणीव पण होत नाही. पण तेव्हा मामानी जळू काढण्यासाठी जी पद्धत सांगितली होती ती अशास्त्रीय आहे, कारण अश्यामुळे जळू आपल्या शरीरात उलटी करण्याची शक्यता असते ज्याने संसर्ग होऊ शकतो. 
            थोडा वेळ चालत आम्ही थोड उंचीवर आलो. वाटेच्या एका बाजूला डोंगराचा उतार होता. गाव आणि रस्ता पण अधूनमधून दिसत होता. कोरडे पडलेले झरे पार करत आम्ही जवळपास गडाच्या अगदी जवळ येऊन पोहचलो होतो. मोकळी जागा आणि बसायला थोडी दगड सुद्धा होती. सर बाटलीतील पाण्याने हात धुत म्हणाले," चला इथे बसून न्याहारी करून घेऊ आणि मग गडावर जाऊ, काय मामा?"  मामा पण हातातल्या पिशवीला खाली ठेवून त्यातला पोहेचा डबा काढत बोलले, " व्हय इथून पुढं किल्लाच सुरू हाय, खावा मग."
चालून थोडी दमलेली आम्ही सगळी आपापली ताट घेऊन मामाकडे जाऊ लागलो. आता मोठी झाड नव्हती, छोटी छोटी झुडप आणि त्यावर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरं बघत बघत आमचा पोहेवर ताव सुरू झाला...


- Chetan Kokatnur
   

Comments

  1. We are getting more and more knowledge about the jungle as story goes forward.....

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. उत्साह आणि उत्कंठावर्धक...🙌👌

    ReplyDelete
  4. Jungle ट्रेक by staying home धमाल मस्ती

    ReplyDelete
  5. Jungle story being interesting now.

    ReplyDelete
  6. This story is not only giving us knowledge of forest but also creating intrest towards Environment.
    Thanking you so much Sir 😇

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?

                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आप...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज

                सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत. हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. २०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म...