Skip to main content

वेलकम टू जंगल...



                                 

                             अगदी पहाटे झोपेतून कोणीही न उठवता आयुष्यात पहिल्यांदा उठलो. परंतु मी लवकर उठलो याचा भ्रम काहीच वेळात मोडला. त्याच झालं अस की, बाहेर आवरायला गेलो तेव्हा पाहिलं सर तर केव्हाच उठून तयार होते आणि कालचे जेवण बनवणारे शिपाई मामा कढईत पोहे ढवळत होते. तरी आम्ही पटापट आवरून एखाद्या मोहिमेला सज्ज व्हावे तस शाळेच्या पटांगणात येऊन उभे राहिलो. शिपाई मामांनी पोहे एका डब्यात भरून घेतले आणि आणि आम्ही सगळे जण मोठ्या उत्साहाने शाळेच्या बाहेर पडलो.

मादी

नर

             साधारण सकाळचे सात वाजले असतील. पावसाळा संपला असला तरी त्याची ओल अजूनही जमिनीमध्ये होती. गाव सोडून आम्ही एका डोंगराच्या पायथ्याला आलो. वाटेत जंगलाची चाहूल देणारे हळद्या, जंगल मैना, सुर्यपक्षी, नारंगी डोक्याचा मशिमार हे किती तरी पक्षी दिसत होते. तेवढ्यात अचानक मामा ओरडले , "थांबा...थांबा". आम्ही लगेच सावध पवित्रा घेत थांबलो. "रान कोंबडी हाय बघा तिथ " आमची  चाहूल लागताच चुरूचुरू मोकळ्या जागेतून जंगलाच्या काठावरून आत शिरताना आम्ही सगळ्यांनी दोन कोंबड्या पाहिल्या. राखी रान कोंबडी हा पक्षी सकाळच्या वेळेस जंगलात हमखास मोकळ्या जागी आढळतो आणि पायाने पाला पाचोळा खुरडत राहण्याच्या सवयीने त्याचे अस्तित्व लगेच लक्ष वेधून घेते.  आपल्या पाळीव कोंबड्यांच्या आकाराचा असतो हा पक्षी. मादीच्या अंगावर राखी रंगाच्या ठिपक्यांची रचना असते तर नराचा लाल रंगाचा तुरा आणि विळ्याच्या आकाराची काळी तुकतुकणारी शेपूट ही खूप आकर्षक असते. आम्ही जसे जवळ जात होतो तसे या रान कोंबड्यांचा  कुकु....कु..हू... कू..... असा आवाज देखील तीव्र होत होता.  आता आम्ही बरोबर जंगलात आत शिरणाऱ्या एका वाटेच्या दिशेने जात होतो. तेवढ्यात मगापासून आमच्या पुढे चालणारे मामा थांबले आणि पाठीमागे आमच्याकडे तोंड करून बोलले" बघा पोरांनो आता इथून पुढं खर जंगल सुरु होतंय, कोंबडी न तर तुमचं स्वागत केलाच हाय. खर पुढं काय बी असू शकत. सकाळची वेळ हाय, गव पाण्याला गावात उतरलेली असत्यात. ( गवा रेडा हा प्राणी पाणी पिण्यासाठी गावाच्या आसपास येत असतो ) तवा यापुढ अजिबात आवाज करायचा नाय, माझ्यामागून गुमान या, काय दिसलं तर दाखवतो " अस बोलून मामा सरळ जंगलाच्या त्या अरुंद वाटेतून आत शिरले आणि आम्ही काही न बोलता गुपचूप मुंगीच्या रांगेप्रमाने त्यांच्या मागून चालू लागलो....



- Chetan Kokatnur

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

वाइल्डलाईफ फोटोग्राफर - नेमक कोण?

                      काही दिवसांपूर्वी कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरील जोतिबा डोंगर परिसरात एका बिबट्याचं दर्शन झालं. आपल्या कोल्हापुरातील एक नामंकित वन्यजीव छायाचित्रकार धनंजय जाधव यांनी त्याला आपल्या कॅमेरामध्ये टिपलं आहे. आता कोणतीही बातमी असो वा माहिती सध्याच्या काळात ती कागदी माहिती साहित्यापेक्षा आपण मोबाईल वरच पाहणं अधिक पसंद करतो आणि हे जगमान्य आहे. या बिबट्याचा फोटो हा फेसबूक,  whatsup चे स्टेटस यावर दिसत आहे; पण खरा विचार करायला लावणारा मुद्दा हा त्या पोस्ट खाली असलेल्या कमेंट्स आहेत. 'हा फोटो पोस्ट का केला? ', 'स्थळ सांगू नका', 'कोल्हापूरच्या फोटोग्राफर ना काय झालंय; प्रसिध्दीसाठी वन्यजीवांचा बळी घेऊ नको.' अश्या बऱ्याच कमेंट पाहायला मिळाल्या. हे सगळं वाचून एक गोष्ट समजली की आपण वारंवार उच्चारत असलेला 'वाईल्ड लाईफ फोटोग्राफर' याचा नेमका अर्थ खूपच कमी लोकांना समजला आहे आणि त्यामुळेच त्या फोटोग्राफरने काढलेले फोटो, त्यासाठी घेतलेले कष्ट, ओढवून घेतलेला धोका आणि त्या फोटोच्या माध्यमातून द्यावयाचा संदेश याबाबतींत आप...

' शिकारी '...एक बदनाम भूमिका

                                  नु कताच भारतात चित्यांच आगमन झालं. जगातील एक वेगवान शिकारी म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे हे वन्यजीव सध्या सामान्य माणसाच्या कुतूहलाचा विषय बनले आहेत. प्राण्यांमध्ये मार्जार कुळातील सर्वच प्राणी हे शिकारी असतात. जसे की वाघ, सिंह, बिबट्या, रान मांजर अगदी आपल्या घरात सापडणार मांजर सुद्धा. आता शिकारी प्राणी म्हणजे मांसभक्षक प्राणी असा अर्थ घेऊ नका. कारण मांसभक्षक प्राण्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वरील गटात मोडणारे जे की स्वतः शिकार करून अन्न मिळवतात आणि दुसरा गट आहे तो म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारा. ज्यामध्ये तरस, गिधाड इत्यादी जीव येतात. हे जे शिकारी प्राणी असतात ते आपल्या भुकेनुसार शिकार करत नाहीत, म्हणजे आज जास्त भूक आहे तर एखादा मोठा प्राणी मारू,कधी कमी भूक आहे ते छोटा मोठा प्राणीही चालेल. कारण त्यांच्यासाठी शिकारीची निवड करणं हा पर्यायच नसतोच. भुकेच्या वेळी समोर असणारा कोणताही आपल्या आवाक्यातला प्राणी त्यांचं भोजन बनतो. निसर्गाने ही रचना अश्यासाठी केले...

कोल्हापूरच्या आसपास यंदा गव्यांचे दर्शन लवकरच होण्याची शक्यता ; प्रशासन तसेच नागरिकांनी सजगतेने सामोरे जाण्याची गरज

                सध्या चर्चेचा आणि काळजीचा एकच विषय सगळीकडे सुरू आहे, तो म्हणजे पावसाचे कमी प्रमाण. येणाऱ्या वर्षात पाण्याची होणारी कमतरता लक्षात घेऊन प्रशासनापासून गावगावातील लोकही पाण्याची व्यवस्था आणि नियोजनाला लागली आहेत. हे झालं आपलं, म्हणजेच माणसाच, परंतु पावसापाण्यावर माणूस सोडून इतर पशु पक्षीही अवलंबून आहेतच की, त्यांचा विचार आपण करतोय का? किंवा यातून वन्यप्राण्यांची हालचाल किंवा त्यांच्या वर्तणुकीत काही बदल होवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मागील काही घटनांचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. २०२२ सालच्या डिसेंबर महिन्यात कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी गव्याने लावलेली हजेरी हि सर्वांच्या लक्षात असेलच. शहर सोडून आसपासच्या गावात खासकरून कोल्हापूर शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील गावे ज्यामध्ये बालिंगा, प्रयाग चिखली, शिंगणापूर, वडणगे, शिये, भुयेवाडी, सादळे मादळे इत्यादी गावात गव्यांचा वावर होता. भुयेवाडीत गव्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे म...